बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...
समाजसेवा, समाजकारण या गोंडस नावाखाली आपल्या समाजातील तरूणांकडून होणारी चमचेगिरी व चमकोगिरी आणि त्याचे स्वरूप.
सध्याच्या वर्तमान राजकारणात कार्यकर्त्याची असलेली अवस्था. पुर्वी अज्ञानी व देवभोळे लोकं देवाधर्माचे भक्त असायचे. परंतु आज आपल्या समाजातील तरुण आपल्या आसपासच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा भक्त झाला आहे. आसपासचे आमदार, खासदार, पंचायत समित्यांचे सभापती, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गल्लीबोळातील नेते, कार्यकर्ते, 'आमचे आण्णा', 'आमचे भाऊ', 'आमचे मित्र', 'हमारे भय्या', 'उभरतं नेतृत्व', खंबीर नेतृत्व यांचा तो भक्त झाला आहे. सोशल मीडियावर तर अशा भक्तांचा अक्षरशः उत आलाय. ना विचार, ना ध्येय, ना कोणत्या गोष्टीचे यथोचित ज्ञान, ना स्वाभिमान. यापैकी जवळ काहीच नसताना समाजातले तरुण कुणाचे ना कुणाचे भक्त होऊन सोशल मिडीयावर चमकोगिरी आणि चमचेगिरी करताना सर्रासपणे दिसून येत आहेत. ही परिस्थिती केवळ एक-दोन गावची तालुक्याची, जिल्ह्याची किंवा विशिष्ट अशा एका जातीतल्या तरूणांची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आहे. सर्वत्रच ह्या अशा अंधभक्ताचाच सुळसुळाट झाला आहे. ही भक्त मंडळी समाजकार्याच्या नावावर चमकोगिरी करत असतात. हीच त्यांची समाजसेवा. समाजसेवेच...